मुंबई : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड इथे, हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रताप यांच्या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी, असं आव्हान विरोधकांना दिलं आहे. तसेच, स्पर्धा करायची असेल तर आरोग्यदायी स्पर्धा करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…
यावेळी, “दुसऱ्या लाटेबाबत आता काही ऐकायला आणि बोलायलाही नको वाटतं. ते दिवस भयंकर होते. अजूनही अंगावर काटा येतो. तुम्ही सर्व जणं, आपल्या प्रशासनाचे अधिकारी आणि शिवसैनिकांनी रात्रं जागून जनतेच्या हितासाठी काम केलं. त्या सगळ्याला तोड नाही”, असं कौतुक करत, “प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे, लवकरच आपलं राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत देशातील स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसऱ्या लाटेवर चर्चा, यंदाही साधेपणानेच करावे लागणार सण साजरे
तसेच, “कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. गाव कोरोनामुक्त तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त”, असं म्हणत, “दुसरी लाट ओसरली आणि राज्यात काही जणांचं राजकारण सुरू झालं आहे. लाट ओसरल्यानंतर आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे आंदोलन कसली करताय? करोना हा काय सरकार मान्य कार्यक्रम नाही. तुम्हाला आंदोलन करायचीच असतील तर ऑक्सिजन प्लांट लावण्याचं आंदोलन करा ना, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे कान उपटले.
Read Also :
- महादेव जानकरांचा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, म्हणाले “आता त्यांनी ठरवायचं दुसऱ्यांच्या घरात…”
- मोठी बातमी : अकरावीची सीईटी परिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द; राज्य सरकारला धक्का
- “मग हा टाइमपास कशाला?”; सुप्रिया सुळेंवर निलेश राणे यांचा जोरदार घणाघात
- मंत्रालयात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करा!
- अमित शहांनी टाळली चंद्रकांत पाटलांची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण