पुणे : गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीय तेढ निर्माण होईल असं भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यावरून पुण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. शिवतीर्थावर झालेल्या मैदानावर राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्मीय, मशिद आणि मशिदीवरील भोंग्याबाबत भाष्य केलं होतं.
हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
राज ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर तोफ धडाडली. त्यांनी यावेळी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधलेल्या मगदूम बाबा दर्ग्याचा विषय बाहेर काढला. त्यानंतर ४८ तासानंतर लगेचच त्यावर प्रशासनानी कारवाई केली. याचा व्हिडीओ राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत देखील लोकांना दाखवला अन् सरकारला इशारा दिला.
हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
मगदूम बाबा दर्ग्याचा विषय बाहेर काढल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टिका करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी जातीय तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती तयार केली आहे. त्याविरोधात पुण्यातील वाजीक रजाक सैय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Read also
- हेही वाचा…राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारो आंदोलन, काॅंग्रेसकडून निषेध
- हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
- हेही वाचा…संसदेत ‘संजय राऊतांवर’ शिंदे गट मोठी कारवाई करण्याची शक्यता, थेट लोकसभा अध्यक्षांना पाठवलं पत्र
- हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!