मुंबई : निवडणूक आयोगाने, राज्यसभेच्या महाराष्ट्रा सह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश अशा एकूण सहा रिक्त जागांवर पोटनिवडणूका होणार आहेत, तर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडून, त्याच दिवशी निकाल देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगतिले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून राजीव सातव यांची जागा रिक्त झाल्याने त्यांच्याकडून उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आता काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’
त्यांच्या नावावर मोहोर उमटवल्याचे पत्रकच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, या शर्यतीत काँग्रेसकडून मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला या नावाची चर्चा होती. मात्र त्यांना सगळ्यांना मागे सारून अखेरीस रजनी पाटील यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची जागा देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
Congress President Smt. Sonia Gandhi has approved the candidature of Smt. Rajani Patil as Congress candidate for the ensuing bye-election to RS from Maharashtra. pic.twitter.com/0X8mS002jj
— INC Sandesh (@INCSandesh) September 20, 2021
भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार
दरम्यान, भाजपने देखील आपला उमेदवार जाहीर करून काँग्रेसला आव्हान दिले आहे. पुण्यात एका पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी, भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. ‘संजय उपाध्याय हे आमचे मुंबई भाजपचे सरचिटणीस, राज्यसभेचे उमेदवार असतील. २२ ला सकाळी ते फॉर्म भरायला जातील,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, उमेदवार देऊन भाजपने ही निवडणुकही चुरशीची बनवली आहे.
सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
ज्या राज्यसभेच्या एकूण ६ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश असून, म.प्रदेशातील एका जागेचा, प.बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील २ रिक्त जागांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
Read Also :
- शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
- ‘गडहिंग्लज आणि पारनेर साखर कारखान्यात घोटाळे, उद्या ईडीला पुरावे देणार!
- ‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला
- ‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
- २ काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर येणार! पाटलांच्या विधानाने खळबळ