मुंबई : देशभरात महामारीचा उद्रेक झाला असून, गुरुवारी देशात ३ लाख ४२ हजार ८९६ सक्रिय बाधित रुग्ण आढळले, तर ३ लाख ४४ हजार ५७० रुग्णांनी आजारातून बरे झाले. तसेच, ३ हजार ९९७ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे देशात ऑक्सिजन, रेमेडीसीवर आणि लसींची कमतरता जाणवत असून, आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे. ऑक्सिजन अभावी देशात अनेक बाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जगभरातल्या अनेक देशांनी देशाला महामारीच्या परिस्थतीतून सावरण्यासाठी अनेक प्रकारची उपयुक्त मदत देऊ केली आहे.
दरम्यान, यावरून देशभरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात असून, राज्यातून देखील केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील एक ट्विट करत, “तुमच्या इथे चहात बिस्कीट बुडवले जात असेल, मात्र आमच्या इथे चहामध्ये पूर्ण देशच बुडून गेला”, अशी उपाहासात्मक टीका केली आहे.
डूबता होगा तुम्हारे यहाँ चाय में बिस्किट
हमारे यहाँ तो चाय में पूरा देश ही डूब गया— गांधीदूत-Atul Londhe Patil (@atullondhe) May 13, 2021
काँग्रेसकडून सातत्याने केंद्रावर टीका केली जात असून, राज्यात देखील भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान, आघाडी सरकारने राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून, आता राज्यात १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंधासकट लॉकडाऊन असणार आहे.
Read Also :
- कोरोना एक जीव आहे, त्याला जगू द्या; अकलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते कोण?
- ‘राज्याचा आभासी कारभार करणाऱ्यांना, असले राजकारण शोभत नाही’
- लशीचे डोस राज्यांना पुरवण्यास केंद्रसरकार अपयशी; खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टीका
- ‘पंतप्रधानांनी पाकिस्तानात बिर्याणी खाल्ली, तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का?’
- मराठा आरक्षणावर केंद्राची पुनर्विचार याचिका, अशोक चव्हाण म्हणाले…