मुंबई : मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला फुलं वाहत असतानाचा फोटो ट्विटरवर शेअर करत आज पंतप्रधान नरेंद मोदी यांनी, “राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचं नाव बदलून ते ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ केलं असल्याचं जाहीर केलं. “खेलरत्न पुरस्काराला ‘मेजर ध्यानचंद’ यांचं नाव असावं, अशी मागणी देशभरातून केली जात होती. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, त्यांच्या नावाने देणं हाच उचित सन्मान आहे”, असंही ते म्हणाले.
मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
दरम्यान, आता यावरून काँग्रेस आक्रमक झालं असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे. याच मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम हे सरकार करत असून, देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीही त्याच द्वेषातूनच आहे. या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“नावं बदलायची सोडून भाजप देशात विकासाठी काही करणार का?” काँग्रेसने घेतला आक्रमक पवित्रा
यावेळी त्यांनी, नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान काय आहे? मोटेरा क्रिकेट स्टेडियमला एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते”, पण त्यांनी स्वतःचे नाव दिले. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे आश्चर्य वाटत नाही. आपले सरकार क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचे हित कसे जपत आहे, हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” अशी तिला त्यांनी केली आहे.
भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
दुसरीकडे, मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी, “भाजप देशाला नवीन काही देणार आहे का? की फक्त युपीएच्या काळात राबवलेल्या योजनांची, शहरांची नावं बदलत राहणार?” अशी टीका केली आहे, तर जनतेची अशीही मोठी मागणी आहे की अहमदाबादच्या स्डेडिअमला दिलेलं तुमचं नाव काढून तिथेही एखाद्या खेळाडूचं नाव दिलं जावं. इथेही तुम्ही राजकारण आणणार आहात का?”, अशी टीका संजय निरुपम यांनी केली.
Read Also :
- “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात
- मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
- मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई