मुंबई : सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा विषय धगधगत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप, यावरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
दुसरीकडे, काँग्रेसने देखील आरक्षणासाठीचा लढा तीव्र केला असून, राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, या आरक्षणासंबंधीची विस्तृत माहिती लोकांना देण्यासाठी, २२ जुलैपासून ओबीसी मेळाव्याची घोषणा केली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे मेळावे होणार असून, बारामतीमध्ये २९ जुलै रोजी हा ओबीसी मेळावा होणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली आहे.
“…तर दोन महिन्यांत आघाडी सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल”
ओबीसी आरक्षण टिकावे, महामंडळांना निधी द्यावा आणि घरकुल मिळावे, यासाठी २२ जुलै पासून राज्यभर मेळावे घेणार असून, ६ ऑगस्टला बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार आहोत. ओबीसींनी एकवटावे आणि आपले प्रश्न सोडवावेत, यासाठी या मेळाव्यांचे आयोजन केले आहे. असे सांगत आरक्षण संपवण्याचा घाट काही लोकांचा आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
‘‘वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण पहिला यायचा; असंच मुख्यमंत्र्यांचं आहे’’
मी मंत्री असलो तरी सगळे प्रश्न सोडवू शकत नाही, कारण हे ३ पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे काही मर्यादा आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन सगळे प्रश्न प्रभावीपणे मांडले, तर मार्ग निघेल,” असे सांगत, “सर्व ओबीसी बांधवांनी मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामती, राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर मध्यंतरी काँग्रेस मेळाव्यात भाष्य कल्याने, यावेळी नाना पटोले आणखीन काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read Also :
- २३ गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार PMRDA लाच; भाजपच्या कलगीतुऱ्याला राज्य सरकारचा पूर्णविराम!
- “यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षालाही मिळतात”, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- उद्धव ठाकरे : १३ राज्यांच्या सर्वेक्षणातून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
- शरद पवारांनी स्पष्ट करावं की, ते नक्की कोणत्या पदाचे उमेदवार आहेत – सुधीर मुनगंटीवार
- बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, पाहूया ताकद – फडणवीसांच चॅलेंज