मुंबई : काँग्रेस विचाराचे सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने काम केले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणाऱ्या काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
गेल्या काही दिवसात नाना पटोले आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा देखील बोलवून दाखवली होती. तसेच, आगामी स्थानिक संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे देखील त्यांनी आधीच जाहीर केले आहे.
जनता सध्या भाजपा सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. काँग्रेस हाच भाजपाला पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बुथ स्तरावर काम करा आणि गावखेड्यात काँग्रेसचा विचार पोहचवा: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/kvVNPsQOFm
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 14, 2021
जनता सध्या भाजपा सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले. काँग्रेस हाच भाजपाला पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बुथ स्तरावर काम करा आणि गावखेड्यात काँग्रेसचा विचार पोहचवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ते म्हणाले होते.
Read Also :
- ‘महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील’
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, केले ‘हे’ आवाहन
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’
- ‘पायी वारीबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता’