मुंबई : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने, लोणावळ्यात ओबीसी महासंघाने २ दिवसांची ओबीसी (चिंतन) परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीकडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत असलेल्या छगन भुजबळांच्या हस्ते झालं.
“वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी, विरोधी पक्षनेता होतो, ओबीसींची नेतृत्व करत होतो. वाटलं होतं, महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटलं. मी ओबीसी आहे ना, मग महसूल खातं का मिळेल?” अशी जाहीरपणे खंत व्यक्त केली.
ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
यांनतर, त्यांच्या या वक्तव्यावर विविध प्रक्रिया येत असून, आता त्यांच्याच पक्षातील नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, “वडेट्टीवारांचं वय पाहिलं, तर पुढे त्यांना मोठी संधी नक्कीच मिळेल, फक्त त्यांनी थोडी वाट पहिली पाहिजे. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन वाढणारा आणि पुढे जाणारा पक्ष आहे,” असं स्पष्ट केलं.
टीकेचं विष प्राशन करुन ओबीसींना आरक्षण मिळत असेल, तर आमची तयारी आहे; पंकजा मुंडे म्हणतात…
तसेच, “वड्डेटीवारांना कदाचित काहीतरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं, बॅ. अंतुलेंना संधी दिली. त्यामुळे वडेट्टीवारांसाठी देखील पुढे मोठी संधी असतील, नक्कीच थोडी वाट पाहावी लागेल,” असं म्हणत त्यांनी, धीर दाखवण्याचा सल्ला आपल्या राजकीय सहकाऱ्याला दिला आहे.
Read Also :
- …तर नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर येणार राष्ट्रवादीचा महापौर? सुजय विखेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
- शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर