“आमचे सरकार स्थिर आहे. ते पाच वर्ष पूर्ण करेल,” असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊतांनी व्यक्त केला. “आम्ही तिन्ही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून एकत्र आलो आहोत. त्यामुळे भाजपने हे सरकार पाडून दाखवावं,” असं आव्हान देखील नितीन राऊतांनी केले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधत आहे. हे सरकार पूर्णवेळ चालेल. आमच्यात कोणतीही नाराज नाही. कोणाचीही मानहानी होत नाही. आमचे सरकार स्थिर असून ते पाच वर्ष पूर्ण करेल. ज्यांना कोणाला हे सरकार पाडायचं असेल त्यांनी पाडून दाखवावं,” असं आव्हान नितीन राऊत यांनी केले.
“भाजप नेत्यांना त्यांचे नेते लक्ष देत नसतील. त्यामुळे मानहानी होत असेल,” असा टोलाही नितीन राऊत यांनी लगावला आहे.