नागपूर : महाविकासआघाडीत सर्वाधिक लाभ कॉंग्रेसलाच झाला. महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या मंत्र्यांना दुय्यमस्थान केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. देशातून काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले. ही काँग्रेसची मोठी उपलब्धी असल्याचे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी (दि.५) शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगत भाजपवर निशाणा साधला.
ग्रामीण भागातील सात प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी) रुग्णवाहिका व पाच पंचायत समितीला चारचाकी वाहन हस्तांतरण सोहळा जिल्हा परिषद मुख्यालयात केदार यांच्या हस्ते झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात दुय्यमस्थान केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. त्यांनी ते द्यावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानतो. काँग्रेस मुक्तची भारत करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले. ही काँग्रेसची सर्वात मोठी उपलब्धी असून भाजपावर निशाना साधला.
सध्या शेतीचा हंगाम आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्र शेतीवर आहे. आठ दिवसांत जिल्हा प्रशासन ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणेल. कोरोना काळात नागपूर जिल्हा परिषदेचे चांगले काम केले. रुग्णवाहिकेसाठी लोकांनी अधिकची रक्कम मोजावी लागली तर ती वेळेत न मिळाल्याने काहींचा मृत्यूही झाला. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेने स्वतः त्या खरेदी केल्या. ही कौतुकास्पद असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले. यावेळी सभापती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, उज्ज्वला बोढारे, नेमावली माटे, प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, नाना कंभाले, शांता कुमरे आदी उपस्थित होते.
Read Also :
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’
- ‘अनलॉक’च्या निर्णयाबाबत गोंधळ का झाला?, मुख्ममंत्री म्हणाले…
- माध्यमांमध्ये जेवढी छाननी आमच्या सरकारची व्हायची, तेवढी आता होत नाही!
- ‘राऊतांच्या धमक्यांना घाबरलो, मला आता पोलीस संरक्षण द्यावे लागेल’