मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या मैदानात लेटरबॉम्ब टाकला आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले जात असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हे पण वाचा, प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब: भाजपशी जुळवून घेऊन परत युती करण्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
दरम्यान, यावरून आता विविध पक्षातील नेते आपापली प्रतिक्रिया देत असून, काँग्रेसकडून देखील यावर भाष्य केले गेले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार सचिन सावंत ट्विट करत, “आ. प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या पत्रातून त्यांचा मानसिक छळ होत आहे हे लक्षात येते. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. येनकेन प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरली आहे,” असा थेट हल्लबोल भाजपवर केला आहे.
आ. प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या पत्रातून त्यांचा मानसिक छळ होत आहे हे लक्षात येते. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. येनकेन प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरली आहे. pic.twitter.com/nofJNiWsdV
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 21, 2021
दरम्यान, सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, “साहेब आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. महामारी काळात आपण प्रचंड मेहनत घेत कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा साभांळ केला आहे. त्याबद्दल आपले कौतुक करावे, तितके कमी आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, दिलेले वचन पूर्ण केले आहे. पण या परिस्थीत जे काही राजकारण सुरु आहे, त्या सत्तेत एकत्र राहुन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, तसेच आपला पक्ष कमकुवत करत आहे. जर अशी परिस्थी असेल तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे आहे. हा माझा वैयक्तिक सल्ला आहे.
हे पण वाचा, युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
कोणतीही चुक नसताना आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणाकडून नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून, ही बदनानमी चालू आहे, त्याला कुठे तरी आळा घालणे गरजेचे आहे. तसेच याप्रकरणामध्ये आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुंटुबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोट आरोप होत आहेत. सुडबुद्धीचे राजकारण चालू आहे. एका आरोपातून जामीन मिळाला की दुसऱ्या आरोपात गुंतवण्यात येत आहे. ही यंत्रणा जाणीवपूर्वक आमच्या मागे लागली आहे. हे कोठे तरी थांबायला हवे.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटली असली, तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध आज ही जिव्हाळ्याचे आहेत. ते अजूनही तुटण्याआधी आपण जुळून घेतलेले आपल्या फायद्याचे आहे. तसेच त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनाही होईल. गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही, शिवसेनेच्या आमदाराची कामे होत नाहीत. भाजपाची युती तोडून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. तसेच राज्यात काँग्रेस राष्ट्रावादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले अशा चर्चाना उधाण आले आहे.
Read Also :
- “भुजबळ खुर्चीवर बसले आणि…”, नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात झाला गोंधळ
- “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
- काही नेते ओबीसी, मराठा आणि इतर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार