नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात, “हिंदू असो की मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे. त्यामुळे, मुस्लिम समाजामधील विद्वानांनी कट्टरपंथीयाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे,” असं वक्तव्य केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली असून, “मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत, हे तपासावे लागेल,” असा खोचक टोला त्यांनी लागावला आहे.
‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
नाना पटोले आज यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भागवतांवर निशाणा साधला. “ते कुठले डॅाक्टर आहेत, हे एकदा तपासून घ्यावं लागेल. देशाच्या संविधानात समभावाची भावना लिहिण्यात-सांगण्यात आली आहे. ही सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने देशभरात मांडली. आपलं रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा, सर्वधर्म समभाव आहे, असं ते बोलले असते, तर त्याचं स्वागत केलं असतं,” अशी टीका त्यांनी केली.
अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी – केशव उपाध्ये
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या पार्श्वभूमीवर, पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका, अशी मागणी त्यांच्यासमोर मांडली. तसेच, मागासवर्गीय आयोगाने मागितलेला ४५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राष्ट्रवादीने पाळली पडत्या फळाची आज्ञा, गर्दी होईल असे सर्व राजकीय कार्यक्रम टाळणार
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सातत्याने सर्वपक्षीय नेत्यांना, राजकीय कार्यक्रम, सभा-समारंभ, आंदोलने-मोर्चे टाळण्याचे आवाहन करत आहेत. तसेच, जनतेलाही त्यांनी मास्क लावण्याचे आणि लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. यावरून पटोले यांनी, “महामारीबाबत सगळा निर्णय केंद्र घेतं व त्याचं पालन राज्य सरकार करत असतं. त्यामुळे, भाजप सरकारला बदनाम करत आहे. त्यांना आंदोलन करायचं असेल, पंतप्रधानांविरोधात करावं,” असा हल्लाबोल भाजपवर केला आहे.
Read Also :
- बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार
- … तर राज्यात लॉकडाऊन अटळ आहे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ दिवस
- “बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
- सरकारने विश्वास संपादन करावा, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही- राजू शेट्टी
- मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही; तोंडघशी पडलेल्या संजय राऊतांचा संताप