सांगली: भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी कोरोना निर्बंधांवरुन दंगलीचा अप्रत्यक्ष इशारा देत वादग्रस्त वक्तव्य केलंय. “आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले, तर वाद विकोपाला जाईल आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही,” असं भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
हे पण वाचा: गृहखात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मेहरबान, इतर पक्षाच्या नेत्यांवर मात्र कारवाई
कडक निर्बंधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यानी हे वक्तव्य केले आहे. कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन निष्कामी झाले. शुक्रवारी दुकाने उघडणार असा इशारा दिला आहे. सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली, तेव्हा ते बोलत होते.
हे पण वाचा: “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
मिरजेत गेले कित्येक दिवस व्यापारी दुकाने उघण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. पण लॉकडाऊन कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. दोन वेळा निर्बध डावलून दुकाने उघण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला, पण पोलीस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली.
हे पण वाचा: ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…
आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. जिल्हा प्रशासन राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिराजेसाठी दंगल नवीन नाही पुन्हा दंगल घडेल असे संकेत त्यांनी दिले आहे.
Read Also :
- “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
- महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
- ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…
- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का उठवली ? कारणे, परिणाम व उपाय..
- फडणवीसांना धक्का; जलयुक्त शिवार योजनेच्या एसीबी मार्फत चौकशीची शिफारस