मुंबई: मागील काही दिवसापासून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या वादग्रस्त विधानमुळे चांगलचे चर्चेत आहेत. स्वबळाचा नारा दिल्यानंतर नाना पटोले यांची गाडी सुसाट सुटली आहे. त्यानी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
हे पण वाचा: लोक जेव्हा मला शिव्या देत होते, त्या काळात शरद पवारांनी विरोधीपक्ष नेता केले
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे असले तरी रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती आहे, असे ते म्हणाले. मात्र, जेव्हा या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाल्यानंतर नाना पटोले यांनी पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली.
हे पण वाचा: आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले; राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही – धनंजय मुंडे
नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. ही भेट काही तास झाली. त्यानंतरही नाना पटोले यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हाती असल्याचा आरोप पाटोले यांनी गुरुवारी केला.
हे पण वाचा: मोठी बातमी: आता मोदी सरकार रेल्वेच्या जमिनी विकणार!
महागाईविरोधात काँग्रेसने राज्यात आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा कंट्रोल हा शरद पवार यांच्या हाती असल्याचे म्हटले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सरकार सुरू आहे, असेही ते म्हणाले.
हे पण वाचा: मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांना आत्मविश्वास
पटोल यांचे वादग्रस्त वक्तव्यावर वक्तव्य
नाना पटोले यांनी स्वत:च्या सरकारसंदर्भात वादग्रस्त विधान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वी पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी हे मोठे वादग्रस्त वक्तव्य केले. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे गृहमंत्री माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. मात्र, या विधानानंतर वाद वाढल्यानंतर भाजपचे सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.