पुणे : मागील काही दिवसापासून गौतमी पाटील हिच्या आडनावावरून राज्यात वादळ उठलं आहे. गौतमी पाटील हिचा आडनाव चाबुसस्कर असून तीने पाटील आडनाव लावू नये. अन्यथा गौतमी पाटलांचं कार्यक्रम होऊ देणार नाही. असा इशारा काही लोकांनी दिला. त्यानंतर मराठा महासंघाने गौतमी पाटील हिला पाठिंबा दिला. यातच आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटिल हिच्या आडनावावरून पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा…“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला
गौतमी पाटील हिचा पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथे बाब उल्लेखनीय आहे की, न्यृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दिक्षीत आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधूरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही. मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार ? अपात्रतेच्या कारवाईला वेगाने हालचाली
नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही. तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले. आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मणवर्णातील आडनाव ही विद्यामय असावीत. क्षत्रिय वर्णीयांची आडनावे वीरमय, वैशांची आडनावे ही व्यापारमय असावी, तर शूद्रांची आडनावे ही निंदनीय असावीत असे गृहीतक आहे . ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे अशा आशयाची येते. शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे हि पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे, बैले, पारवे हत्तीआंबिरे, मांजरे, निळे , हिरवे ई. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा नंतर वर्णव्यवस्था तितकीशी जाणवत नाही. मात्र जात व्यवस्थेची दाहकता आजही टिकून आहे. असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे , ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला
हेही वाचा…“भाजप ही अजगर, मगरीसारखी..!सोबत गेलेल्यांना भाजपाने खाऊन टाकले”
हेही वाचा…तयारीला लागा…! “पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…“संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील,” भाजप आमदाराची राऊतांवर जहरी टिका
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन