मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेँनी पंतप्रधानांची भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘पंतप्रधान मोदींनी आदेश दिला, तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू,’ असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते. याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी, आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उत्तर दिले आहे.
‘चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो,’ असा टोला लगावत त्यांनी, ‘मोदी देशाचे आणि भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांच्याच चेहऱ्यामुळेच गेल्या ७ वर्षांत भाजपला यश मिळालं आहे,’ असं मत व्यक्त केलं आहे.
तसेच, ‘मोदी ज्या पक्षातून पुढे गेले आहेत; त्यांना, पक्षाने प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असं वाटत असेल. साहजिक आहे, वाजपेयींजींचाही फोटो सगळीकडे वापरला जात होता, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटोदेखील आमचे कार्यकर्ते वापरत असतात. त्यामुळे नुसतं आदेश काढून चेहरा वापरणं थाबंत नाही. ते कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं,’ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी, ‘पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. त्यामुळे, मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा यंत्रणेवर दबाब असतो. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं आहे,’ अशी मागणी देखील बोलून दाखवली आहे.
Read Also :
- सत्ताधारी भाजपबद्दल पुणेकरांमध्ये असंतोष; २०२२ ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार?
- कारखान्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि सभासदांच्या काळजीपोटीच मी सहकार पॅनलमध्ये; मदनराव मोहिते यांचे प्रतिपादन
- आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा
- “शिवसेना हा विश्वासू पक्ष”- शरद पवार
- मोदी सरकार लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न करतंय; अजित पवार संतापले