मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचा काल वाढदिवस झाला. यावेळी त्यांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन केले. तसेच, त्यांनी जाहीररीत्या तलवारीचे प्रदर्शनही केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण १७ जणांविरोधात FIR दाखल केला असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात IPC कलम १८८ आणि २६९ अंतर्गत या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
“खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…”, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझमींच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सं. ५-८.३० दरम्यान गोवंडीच्या शिवाजीनगर भागात मोठी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्ते आणि आझमी मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरत होते. तसेच, रथामध्ये बसलेल्या आझमींच्या हातात तलवार होती. या सगळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यानुसार आम्ही ही तात्काळ कारवाई केली आहे, सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.
…अन्यथा, 20 ऑगस्टला “अशोक चव्हाणांच्या घरापुढे मूक मोर्चा काढणार”संभाजीराजेंची घोषणा
दरम्यान, यांनतर यावर आझमी यांना प्रतिक्रिया विचारली असता, “वाढदिवस हा साधेपणाने साजरी करण्यात आला. मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती, वाढदिवसाच्या वेळी पैसे जमा करा, उगाच खर्च करु नका, पैसे पूर आला आहे, तिथे मदतकार्याला पाठवा. पण किती जणांना समजावणार? कोणी हातात लाठी दिली, कोणी तलवार दिली, कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो, ती तलवार धारदार नव्हती, शोबाजीची होती. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाहिलंय स्टेजवर”, असं त्यांनी सांगितलं.
२०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
तसेच, “कोव्हिडच्या नियमांचं उल्लंघन झालं मान्य आहे. पण लोकांना सांगायला गेलं की ते म्हणतात, मोदींनी बंगालच्या निवडणुका का घेतल्या, कुंभमेळा का आयोजित केला. एक जण म्हणतो मास्क लावा, दुसरा म्हणतो लावू नका! लवकर मराल! एक म्हणतो लसीकरण करा, दुसरा म्हणतो करु नका! बस, ट्रेन, लग्न समारंभात गर्दी होत आहे, काय करणार! लोकांचा नाईलाज आहे, ते म्हणतात जे आम्हाला सांगता ते मोदींना सांगा”, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?
एकंदरीतच कोविड नियमांचा सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या नेत्यांना काहीच सोयर सुतक नसतं हेच यातून पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मात्र सर्व सामान्य जनतेवर निर्बंध लादताना कोणताही विचार केला जात नाही आणि याचे उल्लंघन केल्यावर मोठ्या प्रमाणावर दंड आकाराला जातो, हे कितपत योग्य आहे? तसेच हे नियम सगळ्यांसाठी सारखे नसतील तर हा सामान्यांवर होणार अन्याय का समजला जाऊ नये? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
Read Also :
- नाशकाताही राष्ट्रवादी-शिवसेनेत ठिणगी; उड्डाणपुल उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन भुजबळ, शिवसेना खासदारावर नाराज
- अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
- सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका – आशिष शेलार
- संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
- अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच