पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. यामध्ये भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या विस्तारात अपक्ष आमदार आणि महिला आमदारांचा समावेश नसल्याने विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. तर याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांना स्थान दिल्याने आज सामनातुन शिंदे-फडणवीस सरकारवर महाभारताचा संदर्भ देत टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामी आहे. मंत्रिमंडळाचा पळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातुन करण्यात आला आहे.
“भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”
राज्याच्या कल्याणासाठी नक्की काय करणार आहे? शिंदे गटाचे जे लोक मंत्री झाले ते महाविकास आघाडीतही मंत्री होते. त्यातील संजय राठोड यांच्यावर अनेेक प्रकारचे गंभीर आरोप भाजपनेच केले होते. भाजपच्या आरोपांमुळेच राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले होते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात राठोड यांना सळो की पळो करून सोडले. आता फडणवीस त्याच राठोडांच्या मांडीस मांडी लावून बसतील, असा टोला सामनातून लगावला आहे.
“ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
क्रांती दिनाच्या मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच क्रांती म्हणतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्रची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. अखेर 40 दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले,पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही, अशी टीका सामनातून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर करण्यात आली आहे.
Read also
- मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
- फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू
- “ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
- “शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?