परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. परभणी जिल्ह्यात 400 च्याजवळ कोरोना रूग्ण झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परभणी जिल्हयात 19 जुलैपर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील वाढती रूग्णांची संख्या लक्षात घेता खबरदारी घेणे आवश्यक असल्यामुळे परभणी जिल्हयात रविवारी 19 जुलैपर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे.
या संचारबंदीतून शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी, वाहने, शासकीय व खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, तेथील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, अन्न वाटप करणार्या स्वयंसेवी संस्था, माध्यमांचे प्रतिनिधी, परवाने घेतलेली वाहने, दुध विके्रेते सकाळी 6 ते 9 दरम्यान घरोघरी वाटप, राष्ट्रीयीकृत व शेडयुल्ड बँका केवळ रास्तभाव दुकानदार, पेट्रोल पंप चालक, गॅस वितकर व महावितरण यांचेकडून चलनाव्दारे पैसे भरून घेणे, खत, कृषि बि-बियाणे विक्री व वाहतूक त्यांचे गोदामे/दुकाने त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार व कापूस खरेदी केंद्र यांना सुट देण्यात आली आहे.