मुंबई; केंद्र सरकरने शेती विधेयक पास केल्यानंतर सरकारवर टीका होत आहे. त्यातच काल कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी ‘पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का’? असा सवाल उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. एकेकाळी मुख्यमंत्री कार्यालय दाऊद इब्राहिम चालवत होता,मंत्र्यासोबत दाऊदचे गुंड विमानवाऱ्या करत होते, असा गौप्स्फोट आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी हि माहिती ट्विटरवरून दिली आहे.
'पंतप्रधान कार्यालय अदानी आणि अंबानी चालवत आहेत का?'… हुसेन दलवाई
तुमचा प्रश्न उत्तर देण्याच्या योग्यतेचाही नाही. परंतु एकेकाळी मुख्यमंत्री कार्यालय दाऊद इब्राहिम चालवत होता,मंत्र्यासोबत दाऊदचे गुंड विमानवाऱ्या करत होते आणि सध्या काँग्रेस पार्टी चीन चालवतोय हे नक्की. pic.twitter.com/jJLK1eQEO3
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2020
सरकारने संसदेत ‘शेती विधेयकं’ पास केल्यानंतर देशातील शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला असून आता अनेक ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी या बिलांचा विरोध करताना ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवून आंदोलन केली होती. संसदेत ही बिलं पास झाली आहेत आणि आता राष्ट्रपती रामनाम कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
आता या कायद्यावरून महाराष्ट्रात आंदोलन पेटण्याची चिन्हे आहे कारण महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता 25 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारला या कायद्याद्वारे काही वस्तूंंचे उत्पादन, पुरवठा आणि व्यापार नियंत्रीत करता येणार आहे, शेतीमालाला चांगला भाव मिळाला तरी तो कमी भावाने विकावा लागेल, मुळातच शेतकरी अडचणीत सापडला तर सरकार कुठलीही मदत करु शकणार नाही. अस संघटनेच्या त्यासंदर्भात मा.खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटलं गेलं आहे.
Read Also;
मोठी बातमी! शिवसेनेचे दिग्गज नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागणhttps://t.co/NFm4musiz2
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020