मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, “राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. या मुद्द्यावरून निवडणुका लढल्या जातात आणि मतदानही होतं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे याआधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद वाढीस लागला,” असे मोठे विधान केले होते.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोक असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं करण नाही,” अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
दुसरीकडे शरद पवारांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले असून, “राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. आजोबांचं लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला होता, तर राज ठाकरेंनी त्यांचं वाचन वाढवायला हवं. राष्ट्रवादी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. मात्र, राज ठाकरेंचा जातीव्यवस्थेचा अभ्यास नसावा, म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले,” असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
तसेच, यावरून संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्यात देखील जुंपली असून, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी, राज ठाकरे यांच्यावर, “राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आहे. त्यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही,” अशी बोचरी टीका केली आहे. यावर, मनसेकडून पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी, तुम्हला राज ठाकरे काय कळणार, लायकीत राहायचे नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू.” अशा इशारा दिला गेला आहे.
Read Also :
- गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर मुख्यमंत्र्यांनी, गडकरींच्याच उपस्थितीत सोडले मौन; म्हणाले “विश्वासघात…”
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- “पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला