अकोला : महिला बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी, “उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला हवी तशी साथ देत नाहीत,” असा गंभीर आरोप केला आहे. अकोल्यातील ‘हॉटेल मराठा’ इथे आयोजित, ‘अन्यायग्रस्त शेतकरी मेळावा’मध्ये त्या बोलत होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीत नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंनी घेतली उडी; काय म्हणाले नेमकं…
“बालसंगोपन निधी अनुदानात कित्येक वर्षांपासून वाढ झाली नव्हती. त्या निधीच्या माध्यमातून पूर्वी ४५० रु. मिळायचे. आमच्या सरकारने त्यात वाढ करून ते १ हजार १२५ रु. केले. आता परत अनुदानात वाढ करून २ हजार ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पाठवला. मात्र, त्यांच्याकडून आम्हाला हवी तशी साथ मिळत नाही.” असं त्या म्हणाल्या.
परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
यावेळी त्यांनी, केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. “देशात जोवर परिवर्तन येणार नाही, तोवर तुम्हाला-आम्हाला विभागण्याचे प्रयत्न होत राहतील. हे सगळे चित्र घरवापसीच्या नावाखाली होत आहे. एकिकडे आपण ‘रामराम-सिताराम’ म्हणतो. पण दुसरीकडे मात्र देशात, ‘राम तेरी गंगा मेली हो गई,’ त्या गंगेत कित्येक प्रेते वाहत होती. यातून हेच लक्षात येत आहे, कि मोदी सरकार हिंदू विरोधी आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
Read Also :
- “एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- लाच प्रकरण: पिंपरी चिंचवडच्या स्थायीवर सूडबुद्धीनं कारवाई झालेली नाही – अजित पवार
- राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
- तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
- भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील