पुणे : आघाडी सरकारमधले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील कथित वादावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले आहे. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा जलसंपदा विभागात पुन्हा नियुक्ती करण्यात आली, यावरून जयंत पाटलांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महामारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी आणि माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केले. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आणि सर्व मंत्र्यांमध्ये उत्तम समन्वय असून, कथित वादात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पाटील हे खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ, गृह, ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं आहे. यावेळी ते जलसंपदा मंत्रालय सांभाळत आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय शांत असून, अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारा असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. “मी त्याउलट तापट स्वभावाचा आहे”, असे सांगत त्यांनी, “अधिकाऱ्यांसोबत काही जर मतभेद आणि आक्षेप असतील, तर ते तातडीने बैठक समोरासमोर बोलावून घेऊन सोडवले जातील आणि त्या अनुषंगाने योग्य त्या सूचना करण्यात येतील, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं आहे.
Read Also :
- केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा लेखाजोखा मांडावा, अजित पवारांची मागणी
- मुख्यमंत्र्यांच्या अनियोजित भेटीवरून अखेर पडदा उठला, यासाठी गेले होते न्यायालयात…
- …तरीही ५ जूनला निघणार मोर्चा; शिवसंग्रामचे मेटे यांनी पुकारला एल्गार
- “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे”
- ‘राज्याचा आभासी कारभार करणाऱ्यांना, असले राजकारण शोभत नाही’