कोल्हापूर : राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती उद्भवून आता आठवडा उलटला आहे. मात्र यांनतर आलेल्या घोषणांच्या पुराचा लाभ अजूनही म्हणावा तसा पूरग्रस्तांना मिळालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून, मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्र्यांपर्यंत, अश्या सगळ्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला, तरीही अजूनही पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलेलं नाही.
पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
या पार्श्वभूमीवर, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापुरात यासंबधी भाष्य केलं. त्यांनी कोल्हापुरात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती देताना, “जोपर्यंत सर्व चित्रं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पॅकेजची घोषणा करता येत नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळे पॅकेजसाठी पूरग्रस्तांना अजून थोडे दिवस कळ सोसावी लागणार असल्याचे दिसते आहे.
“पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
तसेच, “पुरामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हा कचरा साफ करण्यासाठी पुणे, मुंबईतून वाहन आली असून, अधिकची वाहने देखील बोलावली गेली आहेत,” असं सांगत, “समुद्राच्या बाजूला संरक्षण भिंत बांधणार, या निव्वळ बातम्या आहेत. या प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. तशी मागणी नक्कीच आहे,” असं स्पष्टीकरण त्यांनी संरक्षण भितींबाबतच्या विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे.
“पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
“रस्ते वाहतुकीबाबत, भराव टाकून पूल तयार करू नये, ही ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत चर्चा करणार आहे. काही ग्रामस्थांनी पंचगंगेतील गाळ वाढला असल्याची शक्यता सांगितली आहे. तीही तपासून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळेसचा महापूर हा अलमट्टीमुळे आला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच, पाणी ओसरत आहे, तसे पंचनामे केले जातील आणि पिकांच्या नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर
राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टीने हाहा:कार उडाला आहे. यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत. मात्र, पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या ५ जिल्ह्यांतील शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
Read Also :
- पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
- राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी; मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन
- “देशाला संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आणि त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं”
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
- सोशल मीडियाचा कमी वापर अन् निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंनी टोचले कान