कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातल्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. सकाळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील शिरोळ आणि अर्जुनवाड रोड भागातल्या पूर परिस्थितीची पाहणी करून तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर कोल्हापूर शहरातल्या पूरग्रस्त भागाचीही त्यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
यांनतर त्यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. अनेक जिल्ह्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतीपिकांबरोबरच घरं, रस्ते आणि पुलांचंही प्रचंड नुकसान झालं. हे पूर्ववत करण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त नागरिकांचं अन्यत्र स्थलांतर करण्यात आलं. सध्या अत्यावश्यक सेवा सोडून कोल्हापुरातल्या इतरांना इंधन न देण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सध्या वाहतूक सुरळित करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळा संपल्यानंतर त्यांचं व्यवस्थित नियोजन करण्यात येईल. जिथं जिथं मदतीची गरज आहे. तिथं मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं पवार यांनी सांगितलं.
“पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
पूरग्रस्तांना राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी महिनाभर पुरेल इतकं धान्य देण्याची सरकारची तयारी आहे. भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, त्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, असं ते म्हणाले.
Read Also :
- “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर
- पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
- “देशाला संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आणि त्यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावरचं”
- “या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!