मुंबई : कोरोना काळात ठाकरे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरुच होता. सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी रुपये लुटत होते, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.
भाजप आमदाराच्या मॉलमध्ये राष्ट्रवादीची दुकाने; खासदार अमोल कोल्हे यांच्या समोरच पक्षाचा भांडाफोड
इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1 हजार 500 कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. 27 हजार ग्रामपंचायतींचा TDS रिटर्न भरण्यासाठी पुढील 10 वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं. 8 महिन्यांपूर्वी मुश्रीफांचे जावई मतीन यांनी ही कंपनी विकत घेतली. जयोस्तुते कंपनीचा मागच्या 8 वर्षात एक रुपायाचंही आवक-जावक नाही. याचा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे. याबाबत तक्रार करायला जातानाच मला अडवण्यात आलं होतं. ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय.
खडसे विरुद्ध खडसे संघर्ष टळला, खासदार रक्षा खडसे यांचा अर्ज झाला बाद
मुश्रीफांसह सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधलाय. अनिल परब यांना नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत रिसॉर्टची मानली नेमकी कुणाची? परब यांना आता न्यायालयात उत्तर द्यावं लागेल. हा रिसॉर्ट अनधिकृत आहे, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
Read Also :
- रुपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चित्रा वाघ यांचा पहिल्यांदा विरोध आता शुभेच्छा
- जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये; अजित पवारांच्या बॅनरची चर्चा
- बीडमध्ये काँग्रेसला पडली मोठी खिंडार! राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा, अशी विजय वडेट्टीवरांची गत झाली – गोपीचंद पडळकर
- उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याआधी ‘त्या’ रात्री काय घडलं? नारायण राणेंनी केला मोठा गोप्यस्फोट