मुंबई : सध्या मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आंदोलने छेडली आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली असून, ‘देशभरात मंदिरे सुरू असताना, ती केवळ राज्यातच बंद आहेत. त्यामुळे, या सरकारला सुबुद्धी मिळावी, म्हणून मी गणरायाला साकडे घातले आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
…त्यामुळे अण्णा पुन्हा उपोषणाला बसणार, दिला महाविकास आघाडीला सरकाला इशारा
त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ‘मंदिरे सुरू करा! ही आमची मागणी केवळ यासाठीच आहे की, आपण हिंदू आहोत. आपले ३३ कोटी देव आहेत. आपण जिथे मानू तिथे देव आहे. पण त्यासोबतच या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोकही आहेत. त्यापैकी कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतं. पुजारी आहेत, सेवक आहेत. या २ वर्षाच्या काळात यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आम्ही मागण्या करत आहोत,’ असं ते म्हणाले.
ईडीच्या कारवाईवर प्रताप सरनाईक यांनी दिला, पुन्हा ठाकरे सरकारला घरचा आहेर
तसेच, ‘राज्यात मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरे का नाही? सरकारने पाहिजे तर त्यांच्यावर नियमावली लावावी आणि मग मंदिरे सुरू करावीत,’ असं सांगत, ‘श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्याच्या स्थापनेच्या निमित्ताने आपण साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, राज्यासमोर जे संकट आहे, ते सरू देत. राज्यावरच्या संकटांपासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळू देत, अशी त्या गणरायाकडे प्रार्थना, ‘ असं मागणं त्यांनी बाप्पाकडे मागितलं.
‘तुमचा भुजबळ करू’ ही धमकी, आता त्यांना देता येणार नाही’
दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने 144 कलम मुंबईत लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, लालबाग परिसरातल्या दुकानदारांना, दुकानं बंद करण्याची नोटीस पोलिसांनी पाठवली. त्यामुळे स्थानिकांत प्रचंड नाराजीं होती. दरम्यान, या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी गुंडाप्रमाणे अरेरावी केली. यावर बोलताना त्यांनी, ‘मारहाण, धक्काबुक्की होणं हे योग्य नाही. दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय,’ असा आरोप ठाकरे सरकारवर केला.
Read Also :
- ‘दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय,’ फडणवीसांचा आरोप
- ‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा
- पटोलेंचा पवारांना टोला, म्हणाले “काँग्रेसनं जमीनी राखायला दिल्या अन् त्यांनी…”
- आधी डरकाळी फोडली, आता नरमाईचा सूर? राणे तीनच दिवसांत पलटले
- ‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण