महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य करत महविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर सडकून टीका केली आहे.
महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेलं सरकार आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच हे सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही, तुम्हीच किमान हे सरकार चालवून दाखवा, असं आव्हान दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेलं सरकार आहे. हे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत. पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे.”