दिवसोंदिवस सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं गूढ वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात ईडीने ईसीआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात लोकांमध्ये मोठी भावना आहे. या प्रकरणात काहीतरी लपवून ठेवले जात आहे, नवीन खुलासे केले जात आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील लोक करत आहेत. भाजप नाही, परंतु राज्य सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी नाकारत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच या प्रकरणात मनी लाँडरिंग झाल्याचे समोर आले आहे. असे दिसून आले आहे की सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब झाली. अशा परिस्थितीत हे प्रकरण ईडीचा अधिकारक्षेत्रात आहे, त्यामुळे मी ईडीकडे ईसीआयआर नोंदवून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली. हा खटला सीबीआयकडे सोपविण्याविषयी एक प्रचंड जनभावना आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास नाखूष आहे.