मुंबई : काल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या मंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळ फेरबदलात, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला, काहींच्या खात्यात फेरबदल झाले, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे.
राऊतांच्या चमकोगिरीचा आणि सामनाच्या संपादकाचा काय संबंध? याचा खुलासा द्यावा – चित्रा वाघ
दरम्यान, काही दिवसांपासून जेव्हा या विस्ताराच्या बातम्यांना सुरुवात झाली, तेव्हा राज्यातून मंत्रिपद कुणाला मिळणार, कोण कोण असणार मंत्रिपदाचा चेहरा याबाबत बर्रेच अंदाज सांगितले जात होते. यात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे नावही त्यांपैकीच एक होते. मात्र, ४३ नवीन मंत्र्यांच्या यादी जेव्हा जाहीर झाली. तेव्हा, त्यात प्रीतम मुंडे यांचे नाव नसल्याने, मुंडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली.
सहकार क्षेत्रात केंद्राची ढवळाढवळ; मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार?
यातच, प्रीतम मुंडे यांचा ओबीसींचा चेहरा म्हणून याही मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने, मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा माध्यमांतून रंगवली जात होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी, भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लबोल केला आहे.
अजून एक जमीन प्रकरण खडसेंना भोवणार?, ईडीकडून पाळेमुळे शोधायला सुरुवात
“तत्कालीन फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले आहेत. त्यांनी एकनाथ खडसे यांना बाजूला सारले, यातून हेच दिसते की, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे नेते फडणवीस यांच्यासमोर उभे होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केलं आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी
- आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
- काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
- पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!