मुंबई : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना भाजप, काँग्रेसचेही अनेक नेते उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्री मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी, भाजपच्या नेत्यांकडे पाहून, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहेत.
‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
दरम्यान, यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, आता त्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे राज्याचं नुकसान होतं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं असेल. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली’, असं ते म्हणाले.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
तसेच, ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण, आजची परिस्थिती तशी नाहीये. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही सरकार विरोधात आंदोलन करत आहोत. भाजप या सरकारला उत्तरदायित्व शिकवत आहे. त्यामुळे, त्या वक्तव्याचा इतकाच अर्थ निघतो की, त्यांच्या लक्षात आलं आहे. सगळीकडे भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे, आपण त्यांच्या शुभेच्छा समजूया”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
“माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल”
यावेळी, ‘काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका पूर्णपणे दुट्टपी आहे. एक दर देशात आणण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर जीएसटीचा निर्णय सरकारने केला. आज काँग्रेस त्याला विरोध करत आहे. त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता त्यांनी पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यासाठी विरोध केला, तर आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करू,’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचक वक्तव्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Read Also :
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
- महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर
- शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी