देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरेशा चाचण्या होत नाहीत महाराष्ट्रात करोना मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, करोनावर उपाय योजना करण्यात काहीसं अपयश आलंय असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO ही मार्गदर्शनासाठी बोलावू शकते असा खोचक टोला यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
तसंच विरोधकांनी चष्मा लावायला हरकत नाही पण डोळ्यावर झापडं लावू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण करोनाच्या काळात रुग्णालयं उभारली आहेत, आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना केल्या आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.