मुंबई : नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांना मुलाखत दिली. तसंच पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता मला आता त्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो आहे असं त्यांनी म्हटलं होतं. अशात आज नवाब मलिक यांनी याच मुद्द्यावरून फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. एवढंच नाही तर भाजपमध्ये फडणवीस यांचं महत्त्व कमी झाल्याचंही ते म्हणाले आहेत.
संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव
मलिक म्हणतात, ‘चिडिया चूग गयी खेत, अब पछताए का होये?’ असं म्हणत नवाब मलिक यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे. सत्तेशिवाय फडणवीस यांना राहता येत नाही हे त्यांनी दोन वर्षांपूर्वी सिद्ध केलं. दोन वर्षानंतरही ते हे म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही. पण दोन वर्षांनी त्यांनी वास्तव काय आहे ते स्वीकारलं आहे.
निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमधलं महत्त्व कमी होतं आहे. भाजपमध्ये जे त्यांचे अंतर्गत विरोधक होते त्या विनोद तावडेंसारखे लोक आता मोठे होत आहेत. विनोद तावडे यांचं तिकिट कापण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना सरचिटणीस करण्यात आलं आहे. यावरूनच भाजपमधलं अंतर्गत राजकारण बदलतं आहे असं दिसतं आहे. विनोद तावडेंना थेट पंतप्रधानांकडे अॅक्सेस मिळणं हे बदलाचे संकेत आहेत असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- …हे मंत्रिमंडळ आहे की बैल बाजार? भाजप नेत्याचा नवाब मालिकांवर घणाघात
- शिवसेनेला मिळणार नवा मित्रपक्ष? ममता बॅनर्जींसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची महत्त्वाची बैठक
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान