मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं, असा खोचक सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दुसऱ्या लाटेचं अपयश हे फक्त मोदींचा ममतांना पराभूत करण्याच्या अट्टहासामुळे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त इव्हेंटमध्ये रस असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या लस महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगावलाय. देवेंद्र फडणवीसांनी इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा, वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं. त्यांनी नागपुरात चार-पाच कोविड सेंटर उभारावेत, असा सल्ला दिला.
ठाकरे सरकारवर देखील यावेळी त्यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरतीच असल्याचा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, प्रकाश आबंडेकरांच्या टीकेला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले असून, आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मात्र मी ते काम कधीच सुरू केलं आहे. नागपूरला थांबून जे करायचं आहे, ते आधीच केलं. ऑक्सिजनचा साठा कमी होता, तो आणला आहे. विविध सेवाही सुरू केल्या आहेत. आम्ही जे काही केलंय, ते कदाचित आंबेडकरांपर्यंत पोहोचलं नसेल. त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवू, असे ते म्हणाले.
Read Also :
- लस घेतल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळे मला कोरोना झाला नाही’
- ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला ? अजित पवार म्हणाले…
- ‘म्युकरमायकोसीस’ रुग्णांच्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- कुस्तीपटूच्या मृत्यू प्रकरणी ऑलिम्पकविजेता सुशील कुमार फरार, एक लाख रुपयांचे इनाम जाहीर