“तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचा, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं होतं यावेळी उद्धव ठाकरे यांनी तीन चारी सरकार असलं तरी हे गरीबांच वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन या मुद्द्यावरून भाष्य केले होते त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य करत महविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर भाष्य केले आहे.