“कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. तरीही सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा कांगावा करायचा. त्यापेक्षा कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे”, असा टोला लगावत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“सरकार पाडताय, असा आपणच कांगावा करायचा. त्याच विषयावर मुलाखती करायच्या आणि त्यावरच बोलायचं, जेणेकरुण खरी जी कोरोनाची लढाई आहे, कोरोनाचे जे प्रश्न आहेत ते दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की, त्यांनी कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“स्वत:च मारुन घ्यायचं आणि स्वत:च रडायचं, ही एक नवी पद्धत आहे. ही पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यामुळे तसाच हा प्रकार आहे. कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.