कोल्हापूर: कोल्हापुरात आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मोठी टक्कर आहे. जिल्हापरिषद निवडणुकीसाठी आता अवघे चारच दिवस उरलेले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील गट आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात अध्यक्षपदावरून चढाओढ आहे मात्र भारतीय जनता पक्षाकडून माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक गट सत्तेला सुरुंग लावण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. माजी खासदार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांची शेट्टींच्या निवास्थानी रात्री उशिरा भेट झाल्याने सर्वांचे लक्ष आता आगामी काळात होणाऱ्या घडामोडींकडे लागले आहे.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
हे पण वाचा, बंटी पाटलांनी शब्द पाळला; गोकुळ कडून दूध उत्पादकांच्या दुधासाठी २ रुपये दरवाढ जाहीर
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जरी पक्षीय राजकारण असले तरी देखील त्याला गोकुळच्या निवडणुकीच्या वचप्याचा वास येऊ लागला आहे. महाडिक घराण्याने आता गोकुळच्या पराभवाचा वचपा जिल्हापरिषदेतून काढण्याचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने ही भेट झालेली आहे मात्र आम्ही फक्त मैत्रीच्या अनुषंगाने भेट घेतली आहे असे धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे तर माझ्या घराचे दरवाजे हे नेहमीच आपल्या लोंकांसाठी खुले असतात अशी दाद देखील राजू शेट्टी यांनी दिली आहे.
हे पण वाचा, कोल्हापुरात गोकूळनंतर आता कोरोनाच्या मुद्द्यावरून महाडिक – पाटील गट आमने सामने
हे पण वाचा, न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ६७ इतकी सदस्य संख्या आहे. यामध्ये अब्दुल्लाट तालुका शिरोळ मतदारसंघातील सदस्य विजय भोजे याना जातवैधता प्रमाणपत्र न्यायालयीन प्रकियेमुळे मतदानाचा अधिकार नाही. अध्यक्षपद निवडीसाठी ३३ सदस्यांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. महाडिक आणि शेट्टी भेटीच्या वेळी जिल्हापरिषद सदस्य दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हापरिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, करुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आदी उपस्थित होते. फक्त बंटी पाटीलच नाही तर राज्यमंत्री यड्रावकर यांच्या विरोध सर्व विरोधी गट एकत्र येण्याची शक्यता वाढलेली आहे.
हे पण वाचा,
सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा