बीड : बीड जिल्ह्यातील राजकारण म्हटले; की मुंडे या आडनावाशिवाय दुसरे काही समोर उभे राहत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि काकांच्या हाताखालून राजकीय डावपेचांचा बाळकडू घेतलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे या दोघांचेही बीडवर जिल्ह्यावर वर्चस्व आहे. मात्र, या दोघांमधले वाद आणि संख्या राज्याच्या राजकरणात सर्वश्रूत आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली, ती २००९ पासून. दिवंगत गोपीनाथ मुंडे जेव्हा लोकसभेवर निवडून गेले, त्यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या परळीच्या खुर्चीवर धनंजय मुंडे यांना परळी विधानसभेचे तिकिट देण्यात येणार, असे निश्चित ठरले असतानाच, ऐनवेळी गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा यांना उमेदवारी दिली आणि नाराज धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचा रास्ता धरला.
मात्र, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा यांनी, ‘धनंजय मुंडे यांचं काम पसंत पडलं नाही, म्हणून मी राजकारणात आले, नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते. तेव्हा इतकं बोललं जात होतं; की धनंजय मुंडे निवडून येणार नाही, पंकजाताई मुंडेंना उभं करा,’ असा खळबळजनक खुलासा केला आहे.
तसेच, ‘धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा लोकांना त्रास होतो. कार्यकर्त्यांवर त्यांचे बिलकुल नियंत्रण नाही, अशी लोकांमधली चर्चा आहे. मात्र, मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. परंतु, धनंजय मुंडे मात्र परळीपुरते मर्यादित राहिले,’ धनंजय मुंडे यांचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य आणि फारसा वावर दिसत नाही. ते जिल्ह्याचे संवेदनशील विषय हाताळताना देखील दिसत नाहीत. ते वाळू माफिया, सिविल सर्जन हे विषय हाताळताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर लोकांची नाराजी आहे. त्यांच्यामुळॆआम्ही ज्या गुंड प्रवृत्ती दाबून टाकल्या होत्या, त्या पुन्हा बाहेर आल्या,’असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
Read Also :
- ‘शिवसेनेला भिवंडीत मोठे खिंडार, बड्या नेत्याने धरली काँग्रेसची वाट’
- ‘आरक्षणाला जबाबदार ठाकरे सरकारच, त्यांच्याच अर्ध्या मंत्र्यांना आरक्षण नकोय!’
- ‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा’
- ‘माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने; आघाडी सरकारला हा बदनाम करण्याचा प्रयत्न’
- पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री