मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. धारावीतील कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)घेतली आहे.
धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. WHO ने राज्य सरकारला उगाचच याचं श्रेय देऊ नये, असं नितेश राणे म्हणाले.
“आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांची जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं”, असं नितेश राणे म्हणाले.
Organisations like the @RSSorg n other NGOs have silently worked day and night to ensure Dharavi is corona free without making any noise so giving all the credit to Maha Gov for it is injustice to them!! @WHO should get their facts right!!!
— nitesh rane (@NiteshNRane) July 11, 2020
दरम्यान “धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”, असा कौतुकाचा वर्षाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.
"There are many many examples from around the world that have shown that even if the #COVID19 outbreak is very intense, it can still be brought back under control"-@DrTedros
— World Health Organization (WHO) (@WHO) July 10, 2020