सोलापूर : राज्यात मराठा आरक्षण आणि आता मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटलेला असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सातत्याने घमासान सुरु आहे. यातच ओबीसी आरक्षणाचा देखील तिढा निर्माण झाल्याने, ओबीसी समाजाने देखील आंदोलनाची हाक दिली आहे.
दरम्यान, ओबीसी समाजाचे नेते आंदोलनावरून एकत्र येत असताना, मराठा समाजाचे नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी, या सर्व आरक्षणाच्या प्रश्नांवरून आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर हल्लाबोल केला असून, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, असा तिखट खोचक सवाल त्यांनी केला आहे.
तसेच, ‘ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना लाजा वाटत नाही का?, नसेल वाटत तर किमान आम्ही मराठा नेते नाहीत हे तरी त्यांनी जाहीर करावे,’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. यावेळी, ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हा आक्रमक असेल,’ असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
Read Also :
- वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे
- “वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..”
- ‘भाजपने सत्य स्वीकारण्याची मानसिकता ठेवाव, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’
- “२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…” भाजपचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला टोला
- भाजपला मोठा धक्का! एकाच वेळी १५ नेत्यांचा पक्षाला रामराम