जळगाव : मी अनेकांना चुना लावला, ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यहार केला अशांना तुरूंगामध्ये पाठवण्यापर्यंत मी चुना लावला ही गोष्ट खरी आहे. माझी आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे. मी कोणत्या टपरीवर काम करणारा नव्हतो. त्यामुळे मला चुना लावण्याची गरज भासली नाही, अशी खोचक टिका राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता केली आहे. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.
खरंतर गुलाबराव पाटलांचा मंत्री होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी राजकारणात सक्रीय होण्याआधी पानटपरी चालवत आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवला होता. याबद्दल गुलाबराव पाटील वेळोवेळी आपल्या भाषणात उल्लेख करत असतात. त्यांच्या याच प्रवासावरून खडसेंनी खोचक टिप्पणी केली आहे. माझ्यावर गरड ओकण्यासाठीच काल मुक्ताईनगरात मुख्यमंत्री आणि तीन-चार मंत्र्यांनी सभा झाली. बाकी काहीच औचित्य या सभेतून दिसलं नाही. मुख्यमंत्री आल्याने जिल्ह्याच्या प्रश्नाला न्याय मिळेलस असं वाटलं होतं. मात्र हाती भोपळा मिळाला. 50 खोके आणि सगळं ओके असा टोला देखील त्यांनी हाणला आहे.
“तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
एकनाथ शिंदे यांची काल जळगावमध्ये सभा पार पडली होती. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. अडीच वर्षात त्यांनी जितकी कामं केली तितकी आम्ही अडीच महिन्यात केली. मी बाहेर फिरलो म्हणून यांना आता फिरावं लागत आहे. यांना दोन मुख्यमंत्री हवे होते, कारण त्यांना सवय नव्हती. गुलाबराव पाटील तोफ आहेत. शिवाजी पार्कवर जेव्हा ते बोलायचे तेव्हा लोक उत्सफूर्त उठायचे. त्यांचं भाषण थांबवलं जात होतं. कारण त्यांना क्रेडिट मिळत होतं. गुलाबरावाचं भाषण कट का केलं? असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना केला आहे.
“तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
दरम्यान, गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे हे चुकीचे आहे. कुणीही शुन्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो. पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय? असा सवाल त्यांनी केला आहे. दोन वर्षात इतकं काम करू की औषधालाही कोणी उपलब्ध राहणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे नेत आहोत, म्हणून हैदराबादमध्येही आमचं स्वागत होतं. 200 क्रॉस झाले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, गुलाबरावनी गद्दारी केली नाही. खोके बिके घेतले नाही.
Read also
- “जर निर्मला सीतारामण यांना वेळ असेल, तर मी स्वत: फिरून त्यांना बारामती दाखवेन;” सुप्रिया सुळे
- “महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे? हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल”; शंभुराज देसाई
- “तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू”; खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य
- “आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल
- पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत