मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेस सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हात अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्यमंत्री तर संदीपान भुमरें यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आहे. त्यामुळे याच औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे सरकारमध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी देखील मंत्रिपदासाठी मागणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार आणि संदीप भुमरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळे आता शिंदे सरकारमध्ये मला स्थान देण्यात यावं असं बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी केलं आहे. तसेच एकाच जिल्ह्यात तीन मंत्रिपद देण्यात येणार नाहीत. अशी समजूत सध्या संजय शिरसाठांची वरिष्ठांकडून काढण्यात येत आहे.
बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
शिंदे गटातून जर औरंगाबाद जिल्ह्यात तीन पदे दिलीत तर भाजपच्या गोट्यातील देखील अतुल सावे, हरिभाऊ बागडे, आणि प्रशांत बंब सारखे जिल्ह्यात मोठे नेते आहेत. त्यामुळे ते देखील मंत्रीपद मागण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये अतुल सावे हे फक्त चार महिन्यांसाठी उद्योग राज्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
दरम्यान, शिंदे सरकारमध्ये नागपुरला तीन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू परिणय फुके संजय कुटे या नेत्यांसह समीर मेघे, आशिष जयस्वाल, रवी राणा यांच्या रूपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Read also
- “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
- सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
- शिंदे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षांसाठी केसरकर, विखेपाटील चर्चेत; उद्या अधिवेशन
- “पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”