परळी : बीडसह मराठवाड्यात पावसाचा हाहा:कार वाढला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पूरस्थितीची पाहणी केली. त्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.
पूर परिस्थितीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्याकडेला पाहणी करतायेत. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल. मराठावाड्याला न्याय देण्यासाठी जयंत पाटील पावले उचलतील अशी मला अपेक्षा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कात्रजचा खून झाला…; पुण्यातील बॅनरमुळे उडाली एकच खळबळ
दरम्यान, बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने ते काल बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच मतदारसंघांचा आढावाही घेतला.
Read Also :
- पुरामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार; उदय सामंत यांची माहिती
- गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना २२ जागा लढवणार – संजय राऊत
- एसटी पुरात बुडाली, तीन जन मेले, चालक बेपत्ता झाला; तरीही पालकमंत्री अजूनही वाऱ्यावरच
- पावसाने सगळ उद्धस्त केलं, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले
- नाशिककरांना सतर्कतेचा इशारा: गंगापूर, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले, अनेक गावांत पाणी शिरण्याची शक्यता