सांगली : तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्र्यवीर सावकरकांवर उलटसुटल लिहितात. त्यावेळी सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? औरंगाबादेत गरोदर महिलेवर अत्याचार होतो. तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय, असं दिसतंय, असा हल्लाबोल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर केला आहे. ते आज सांगलीत बोलत होते.
ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है; नांदेडमधील सभेत छगन भुजबळांचा शायराणा अंदाज
ऐन हिंदु सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून ज़र उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते. त्यावेळेसे ऐरव्ही उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय. तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?
मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद
तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय, असंच दिसतंय अशी टीका पडळकरांनी केली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ‘मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल’, अशी टीका करण्यात आली होती.
Read Also :
- एक एकर शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी द्या; शेतकऱ्याच पत्र
- वाटोळ करायचं अन् मी नाही… मी नाही… काही केलं म्हणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजे संतापले
- तक्रारदार तक्रार करून गायब झाला, कुठे गेला माहित नाही, पण केस सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
- सरकारच्या जीआर’ वर औरंगाबाद’च्या अगोदर संभाजीनगर; नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?
- राज ठाकरे यांची तब्येत बिघडली; मनसेचे मुंबई, पुण्यातील मेळावे अचानक रद्द