औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे.
आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील पीडितेला औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. औरंगाबाद चौकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कँडल पेटवून श्रद्धांजली दिली. यावेळी एमआयएम खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका केली.
“हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?”, असा सवालही यावेळी जलील यांनी उपस्थित केला.
“सुप्रीम कोर्ट, सीबीआय, लोकसभा आणि पार्लमेंटवर विश्वास आहे. परंतु याच संस्था धोका देत असतील तर काळजी करण्याची वेळ आली आहे. पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिले म्हणजे हे गुंडाराज आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
Read Also :
हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या; शिवसेना आमदाराची मागणी
https://t.co/Q4zwh80d1v @BhatkhalkarA @meNeeleshNRane @PratapSarnaik
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020