मुंबई : राज्याच्या राजकारणात विनाकारणच मुख्यमंत्रीपदावरून राजकारण चालू असून, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच सातत्याने मुख्यमंत्री पदाबाबत संभ्रम निर्माण होतील, अशी विधाने आणि उलटसुलट वक्तव्ये केली जात आहेत.
यातच विरोधी पक्षाकडून देखील या आयत्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला जात असल्याने, या संभ्रमाला खतपाणीच घातले जात असून, काँग्रेसकडून आगामी काळातल्या निवडणूका स्वबळावर लढवल्या जातील, असा सातत्याने घोष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला आहे. तसेच, शिवसेना-राष्ट्रवादी इथून पुढे निवडणूक एकत्र लढवणार असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केले आहे. त्यामुळे सारे काही ऑब्ले नसल्याचे आता समोर आले आहे.
यातच आता, ‘काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, नाहीतर पाठिंबा काढून घ्यावा,’ असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी ट्विट करत काँग्रेस पक्षाला दिला आहे.
‘फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस च्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे. जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल, तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा,’ असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. त्यांच्या बोलण्याचा थेट रोख हा नाना पटोले यांच्याकडेच असल्याचे यातून समजून येत आहे.
फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर मविआ सरकार पडेल. काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे जर त्यांना सीएम पद दिले जात नसेल तर काँग्रेस ने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा असे माझे @NANA_PATOLE यांना आवाहन आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 14, 2021
दरम्यान, पटोले यांनी राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर लढेल. त्यावेळी काँग्रेकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास तयारी असल्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे.
Read Also :
- दिल्लीसाठी नारायण राणे रवाना; केंद्रात मंत्रीपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता?
- गुजरात विधानसभेच्या १८२ जागा ‘आप’ ‘स्वबळावर लढणार; तिसऱ्या आघाडीला धक्का
- “विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार
- वारकऱ्याला करता येणार पायी वारी, मात्र राज्य सरकारने घातली मोठी अट
- भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे वारी; संत मुक्ताई पालखीचा प्रस्थान सोहळा उत्साहात