मुंबई : देशात सध्या भाजपविरोधी सूर लागला आहे. या महामारीच्या परिस्थितीत भाजपकडून जी अपेक्षा ठेवून जनता होती, त्या सर्व अपेक्षांना पानं पुसण्याचा प्रकार भाजपकडून घडल्याची भावना आता जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
दरम्यान, याचाच फायदा उठवण्याचा चंग आता देशभरातील अनेक छोट्या -मोठ्या राजकीय पक्षांनी उचलला असून, राज्यात देखील भाजपला नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने राजकीय डावपेच आखले जात आहेत.
यातच, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, ‘केंद्राच्या किंवा उ.प्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल होवो न होवो, उ.प्रदेशात मात्र परिवर्तन होणार हे पक्के आहे,’ असे विधान केले आहे.
शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘फेरबदल करायचा की नाही करायचा हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. तसेच, उ.प्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल मुख्यमंत्री योगी बदल करोत न करोत तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, जनतेने आता मनात बदल करण्याचा विचार पक्का केला आहे,’ असेही म्हटले आहे.
Read Also :
- मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली – राहुल शेवाळे
- पवार, चव्हाण आम्हाला महत्वाचे नाहीत; पंतप्रधानांशी काय चर्चा झाली नीट जाहीर करावं; मेटेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांची उडी; मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा
- उच्च न्यायालयाने दिले आदेश, खासदार नवनीत राणांवर होणार मोठी कारवाई
- संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेणार