रायगड : कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक घरीच राहून करा, किल्ले रायगडावर येऊ नका. तसेच कोरोनाच्या काळात मोर्चे काढून लोकांच्या जीवाशी खेळू नका, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार म्हणाले की, रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करा. तिसऱ्या लाटेसंदर्भात काय उपाययोजना करणार यासाठी बैठक घेण्यात आली आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही ते म्हणाले. राज्याला केंद्राने मदत करावी, असं देखील ते म्हणाले. वादळग्रस्तांना साडेतीन पट अधिक निधी दिला जाईल. समुद्रकिनारी होणाऱ्या नुकसान कमी करण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश वास्तुविशारद यांना दिले आहेत. झेडपीच्या शाळा वादळरोधक , शाळा काँक्रीटच्या बनवण्याचे निर्देश देण्यात आलं असल्याचं अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षण संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने जे वकील दिले होते तेच आम्ही सुद्धा दिले आहेत.कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जाणार असल्याचं ते म्हणाले. कालच्या अनलॉक संदर्भातील झालेल्या गोंधळाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सरकारमध्ये सुसंवाद आहे, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य आहे.
Read Also :
- अजित पवारांच्या बारामतीतच भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; खुले आम घेतले जातायेत पैसे
- उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे
- अदिती चांगलं काम करतेयं, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो
- प्रीवेडींगला कपल येतातं, त्यांना कशाला आडवता, हानिमुनला पण इथेच बोलवा – अजित पवार