मुंबई : आजची सकाळ विद्यार्थ्यी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दीड वर्षानंतर राज्यातल्या शाळांची घंटा वाजते आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरांतल्या शाळाही सुरु झाल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरु झाल्यात. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला आज सकाळी भेट दिली. अंतर्गत शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या.
शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही 40687/
यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत?, दीड वर्षानंतर आता शाळेत येऊन कसं वाटतंय? असे प्रश्न शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. कोरोना नियमावलीनुसार शाळा सुरु झाल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांचं शाळेत आगमन होताच त्यांचं तापमान मोजलं जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
पुढे वर्ग खोल्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेलकम लिहित तुम्हाला पाहून आनंद झाला, असा आशय असलेले बोर्ड दादरच्या शाळेत लावण्यात आले आहेत. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत केलं. दीड वर्षानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची आरती ओवाळण्यात आली. तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्षात शाळेत जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.
सरकार ज्या- ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही आमच्या पैशातून विकास करणार – नितीन गडकरी
शिक्षकांनी लगोलग अभ्यासक्रमाला सुरुवात न करता विद्यार्थ्यांशी गप्पा माराव्यात, त्यांच्या मनावरील ताण हलका करावा, परिस्थितीशी एकरुप व्हायला त्यांना काही दिवस द्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत. राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत. आज शाळा सुरू झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांची संवाद साधणार आहेत.
Read Also :
- देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
- राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील
- रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद – फडणवीस
- विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
- …म्हणून भाजप आमदाराने मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं; चंद्रकात पाटलांनी दिलं स्पष्टीकरण