मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून राज्यात एव्हाना देशात सावरकरांवरून राजकारण सुरू आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी सावरकरांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्त्यव्य करीत आहेत. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष सातत्याने महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. यामध्ये मात्र शिवसेना ठाकरे गटाची मोठी गोची होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
सावरकरांचा अपमान राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. काॅंग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता. त्यावेळी ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी त्यांच्या थोबाडीत मारली होती. तसेच आता राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारणार का ? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे गटाची आघाडीत कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
या संपुर्ण प्रकरणाबाबत संजय राऊत यांनी काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची आज भेट घेतली. तसेच त्यांच्या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.
श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
Read also
हेही वाचा“शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांकडून बापटांना भावपुर्ण श्रद्धांजली”,म्हणाले की…,
हेही वाचा…“१९ महिन्यांचा तुरूंगवास, पाच वेळा आमदार, खासदार, संघाचा कार्यकर्ता,” गिरीश बापटाचा संघर्षमय प्रवास
हेही वाचा…पुण्यातील राजकारणातल्या ‘किंग मेकर’ ची अखेर प्राणज्योत मालवली, खासदार गिरीश बापटाचं निधन
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला